Earth Hour……

Earth Hour…काय भन्नाट idea आहे ! 

सर्व जगभर तो एक तास पाळला गेला..सर्वच लोकांनी पाळला असे नाही :(…असो.. पण ह्या पद्धतीने थोडे का होईना गो ग्रीन ला हातभार लागला असणार ….ग्लोबल वार्मिंग कुठेतरी थोडी कंट्रोल करण्यात ह्या सर्वांचा खारीचा वाटा .

WWF (World Wildlife Fund) हा event organize करते.  मार्च महिन्याच्या शेवटच्या शनिवारी एक तास इलेक्ट्रिक उपकरणे बंद करून Earth Hour पाळला जातो….हेतू हाच कि हवामानातील बदला बद्दल लोकांना जाणीव व्हावी आणि त्यांनी सर्वतोपरी प्रयत्न करून ग्लोबल वॉर्मिंग नियंत्रित करण्यासाठी हातभार लावावा.

Global event to save our planet Earth म्हणून मला ह्याचे विशेष वाटते,  म्हणजे तुम्ही कुठल्या खंडात किवा कुठल्या देशात राहतात, तुमचा धर्म कोणता, तुमचा रंग कोणता ह्याहीपेक्षा पुढे जाऊन आपण सर्व एकाच Planet Earth चे रहिवासी आहोत आणि पृथ्वी सुरक्षित राहावी हि आपल्या सर्वांचीच जबाबदारी आहे….हि भावना जास्त मोठी वाटते.

वसुधैव कुटुंबकम….हे विश्वची माझे घर ….असे आपल्याकडे पूर्वीच सांगून ठेवले आहे…उशिरा का होईना पण जगाला ह्याचा प्रत्येय येतोय आणि पुन्हा एकदा आपली संस्कृती किती समृद्ध आहे हे सिद्ध होतंय.

खूपच चांगल्या हेतूने  सुरु केलेल्या ह्या उपक्रमाचे स्वागतच  आहे….पण तरीही .. एक गम्मत सांगावीशी वाटते…….युरोपिअन आणि अमेरिकन लोकांना ह्या Earth hour चे अप्रूप वाटते….कारण नेहमीच वीज असते …त्यामुळे स्वतः वीज घालवून celebrate करण्यात आनंद मिळणारच.  त्यांच्या जीवनात त्यानिमित्ताने एका कॅण्डल लाईट डिनर ची भर पडली असणार :)…

ह्याउलट  आपल्याकडे…..सरकारचे कौतुकच करायला हवे… कारण असे कित्येक अर्थ हवर्स (!)  आपण रोजच celebrate (?) करतो …..दुर्दैव हेच कि त्याची कोणी दखल घेत नाही ( कौतुकही होत नाही 🙂 आणि प्रश्नही सुटत नाही 😦 ) … मोठी शहरे सोडली तर जवळपास सर्वच राज्यात किमान २ ते ४ तास वीज जाते आणि खेडोपाडी नेमके त्याच्या उलट (२ ते ४ तासच वीज येते)… हे सक्तीचे अर्थ हवर्स आम्ही रोजच भोगतो…..सरकार काहीही करू शकत नाही  किंबहुना त्यांची इच्छाच नाही….नाहीतरी पुढल्या निवडणुकात मुद्दा हवा कि नको लढवायला 🙂 .

WWF ला गेल्या काही वर्षांचे statistics दिले तर कदाचित महाराष्ट्र सरकारचा गौरवच होईल…….Earth Hour साठी सिंहाचा वाटा उचलल्या बद्दल……….